Saturday, December 13, 2008

झालय कुठे काय?

२६ नोव्हेंबरला मुंबईतील दणका सर्व जगाला जाणवलाय, अमेरिका अस्वस्थ झाली, पाकिस्थान नेही कार्यवाही करू अशी दर्पोक्ती केली आहे. पण भारतातील जनता जनार्दनाला याची कितपत जाणिव झाली आहे कोणास ठाउक? दोन दिवसाच्या अथक कार्यवाही नंतर दहशतवादी मारले गेले. पण आपलं सगळं पितळ उघडं पाडून मेले.
दहशतवादापेक्षा अधिक महत्वाचे अंतर्गत रोगांनी आपल्याला ग्रासलय त्याकडेही पहाणे आवश्यक झालय.
भ्रष्टाचार हा तर एडस पेक्षा अति घातक, तो दहशतवादाला मदत करतोच, म्हणून तर दहशतवादी राजरोसपणे सर्व सीमांचे उल्लंघन करून सहजपणे कोठेही कोणत्याही शहरात राहू शकतात.
पंचतारांकित हाटेलात साध्या भारतीयाला हटकणारे भरपूर असतील, गरीबाला लांबूनही बघणे जीथे दुरापास्त तेथे दहशतवादी चार चार गोणी सामान काय एका दिवसात घेउन जाउ शकतात? तेथील सरदारी दरवानांचे हात आणि मुंडकी दिवसरात्र सलाम करून शौर्य काय असते ते विसरून गेले आहेत. टिप्स घेउन लाचार झालेले हात आता गुलाम झाले आहेत.भारतीय आदरातीथ्याच्या नावावर दरवानांचे मिशांचे झुपके फक्त देखल्या देवा सारखे उरलेत. दररोजचे हजारो लाखो रुपये घेउन धंदा करणा-या ह्या हाटेलना स्वत:ची सुरक्षा यंत्रणा कोणतीच नाही काय?
CST रेल्वे स्टेशन वर तर प्रवासींची झालेली हत्या तर फारच दयनीय होती. दोन दहशतवादी क्षणार्धात साठ सत्तर मुडदे पाडतात, आणि बाकी गर्दी काय शांती मंत्र म्हणत आपलं षंढत्व झाकतं! एक माईचा लाल ह्या गर्दीत न जन्मावा ह्याच फार वाईट वाटतं. दुस-याच्या दु:खाकडे आपल्या घाईच्या नावावर कानाडोळा करण्याची वृत्ती येथे धोका देउन गेली.
पंचवीस वर्षापूर्वीचा मला डोंबिवली स्टेशन मधिल प्रसंग आठवतोय. महिलांच्या डब्यातून एक गरोदर महिला उतरताना फ़लाटावर पडली, डब्यातील शंभरहून उतरलेल्या अगदी मध्यमवर्गी मराठमोळ्या महिला तीच्याकडे न बघता,ओलांडून स्टेशन मधून बाहेर पडत होत्या, डब्यात चढणा-या तीला ओलांडून चढल्या, हजारो पुरुष तेथून सटकले, पण एक जणही तीला मदत करायला धावला नाही. तीची पर्स व पिशवी उचलून मी त्या ताईंना बसवलं. त्यावेळी डोबिवली स्टेशन वर पिण्याचे पाणीही मिळले नाही, त्यावेळी बिस्लेरी मिळत नव्हत्या. पाच दहा मीनीटात स्वत:ला सावरून ती उभं रहाण्याचा केविलवाणा प्रयत्न करू लागली, एव्हाना फ़लाटावर पाच दहा महिला लेडिज ड्ब्याजवळ आल्या होत्या, तरीही कॊणी तीला उभ रहायला मदत केली नाही.लोक काय म्हणतील हे सर्व विसरून मी त्या ताईला उभ केलं. कुठ जायचय, चालवतय ना विचारून पिशवी पर्स घेतली व त्यांना हात धरून पूर्वेकडे रिक्षापर्यंत पोचविले. सांगायचा उद्देश एवढाच,वेळेला उपयोगी पडायचे नसेल तर जगायचं तरी कशाला? घाईच्या नावावर माणूसकी विसरत असाल तर भारतीय संस्कृतीचे गुण गायची मूळीच आवश्यकता नाही.
रेल्वेच्या एकाच डब्यात चार जणांची पाकीटे मारली जातात, एकाला पकडलं जातं. त्या पाकेटमाराचे सोबती त्याला मारायच नाटक करित खाली उतरतात आणि रेल्वे सुरु होताच हसत हसत परत आपल्या कामाला लागतात. ईतरांच्या दुःखाचा क्षणभर तरी विचार करायला हवाच! ह्या सगळ्याचा कहर म्हणजे हरविलेल्या पाकिटातील ड्रायव्हींग लायसेन्स मिळ्वून देण्यासाठी एका पोलिसांने एक हजार रुपये मागितले. जनतेचे रक्षकच जर चोरांचे सा्थीदार बनून जगत असतील तर बघायचे तरी कॊणाकडे?
नोकरशाही आणि लोकशाही यांनी एकमेकावर अंकूश ठेवला नाही आणि हातात हात घालून भ्रष्टाचार करू लागले तर देशाचे भविष्य जाणार तरी कोठे?
२६ नोव्हेंबरचा एपिसोड शिवराज पाील, आर आर आबा आणि विलास रावांचे बळी घेउन नूसताच थांबला नाही तर नारायणास्त्र नीकामी करून अशोकरावांची वर्णी लाऊन गेला. देशावरील संकटसमयात गृहमंत्री पदावर कोणीही नसताना, देशाचे संरक्षण मंत्री व परराष्ट्र मंत्री महाराष्ट्राचे मुख्यमंत्री निवडण्याचे हिजडचाळे चार दिवस करित होते.त्यांच्या पुरुषार्थाला साजेलसा निर्णय त्यांनी स्वतः न घेता परत दिल्लिला सोनियाचे दारी जाउन सोडवला.
ह्या सर्वावर कहर म्हणजे लोकसभेतील पाच खासदार अटॅक च्या वेळी ताज मधे उतरले होते. हे जनतेचे सेवक खासदार समितीच्या नावावर कोणत्या तरी कंपनीच्या लाचार कृपेने पंचतारांकीत हॉटेलात रहात होते. त्यातील जयसींगरावांची प्रतिक्रिया लाज आणणारी होती,जनता जळत असताना जयसींगराव लॅ्पटॉप वर इलेक्शन्चा प्रोग्रॅम ठरवीत होते. त्यांची ताज मधिल खातिरदारी चांगली होती हे सांगायलाही ते विसरले नाहीत. मढ्यावरचे लोणी खा्णा-या ह्या खासदारांना दहशतवाद्यांच्या आधी गोळ्या घालून मारायला हवे.
भाजपाच्या तोंडातील राजस्थान व दिल्लीचा घास कॉन्ग्रेसच्या मुखी लागला, दिल्ली व रा्जस्थान मधील मुस्लिमांची एक गठ्ठा मते कॉन्ग्रेसला मीळाली. बसपाची मते कमी झाली. हिंदूत्वाच्या नावावर गुजरात नको हिच भावना मुस्लिमांची असावी.
नारायण राण्यांचा नारोबा करण्याचा चान्स समग्र कॉन्ग्रेसवाल्यानी सोडला नाही. एका आमदाराची प्रतिक्रिया फारच बोलकी होती. लोकसभा निवडणूकीच्या आत नारायण राणे वेगळे पाडायचे हे समजूनच त्याना कॉन्ग्रेसमद्ये घेतले होते.ते बाहेर जातांना त्याच्याबरोबर कॉन्ग्रेसवाला कोणीही नसेल तर त्यानी आणलेले काही जण कॉन्ग्रेसमधेच रहातील. आणि घडतयही तसेच. नारायणराव आता माझ्या बोलण्याचा अर्थ असा नव्हता अ्सेही खुलासे करित आहेत.एकूण काय राण्य़ानी पांघरलेले वाघाचे कातडे उसवले.
शहिद पोलिसांना श्रद्धांजलीचे राजकारण सर्वच करित आहेत. केरळचे मुख्यमंत्री अच्युतानंदननी चटकन माफ़ी मागून पडदा पाडला. नरेन्द्र मोदींनी देउ केलेल्या एक कोटीवर विलासराव कोटी करायचे विसरले नाहीत, पण मदतीचा हात देताना आकडा फ़ुगलेला दिसला नाही.सा्ध्वीचे राजकारण करायला गेलेल्या ATS ला दहशतवाद्यांकडून चपराक मिळाली हे मात्र वाईट झाले.
शांतीमंत्राचे अनुसरण करणारी जनता, स्वतःची शक्ती ऒळखून प्रतिकार करायला वेळेवरच शिकली नाही तर स्वतःच्या घरी दारीच पानीपत घडतांना बघायला मिळेल. शारीरीक आ्णि मानसिक शक्तीची प्रतिष्ठापना प्रत्येक नागरिकाने करणे आवश्यक आहे. राष्ट्रिय स्वयंसेवक संघाने सेवा कार्याबरोबरच हे काम अधिक जोमाने करायला हवे. स्पर्धेच्या युगात संघ विद्यार्थी व युवकांना आकृष्ठ करण्यात अपूरा पडतोय हे मात्र खरे आहे. रामदेव बाबा,SSY,सहजयोग,रविशंकर किंवा आध्यात्माकडेही वेळप्रसंगी झुकणारा तरूण वर्ग राष्ट्रीय कार्यात उतरतांना उदासीन का? ह्याचे उत्तर शोधलेच पाहिजे.
जनता मनातून घाबरली असली तरी झालय कुठ काय? सारखं वागत परत कामाला लागलेली दिसत आहे.

6 comments:

veerendra said...

कुठल्याही एकाच संस्थेला किंवा रचनेला उद्देशून लिहिलेले किंवा तेच तेच विषय चघळत अनेक लेख या दिवसात ब्लॉगविश्वात दिसले.. पण तुमचा हा लेख त्या लेखांवर एक जळजळीत तडका होता. नक्कीच शेवटच्या परिच्छेदातील मुद्द्याकडॆ संघापेक्षाही संघाच्या [माझ्यासारख्या] असक्रिय ..[ निष्क्रिय नाही .. ] स्वयंसेवकांनी विचार करून त्यावर पाऊल उचलले पाहिजे. असे मला वाटते.

veerendra said...
This comment has been removed by the author.
Harshada Vinaya said...

प्रश्न..प्रश्न.....

आपण खरंच आपली विवेकबुद्धी हरवून बसल्यागत वागतो..
.
दशतवाद, दहशतवाद असा आरडाओरडा केल्याने ही समस्या मूळात सुटणार नाहीच पण
लोकांमध्ये एक प्रकारचा incompetence मात्र नक्की येइल. त्या कोवळ्या
पोरांना "जिहाद" च्या चूकिच्या संकल्पनांकडे वळवणा-या काही लंपट मौलवी
आणि मूळात त्या मूलांना त्या विचारसरणीशी समरस करून देणारी सामाजिक
परीस्थिती ह्या बाबी राजकारणांच्या, पत्रकारांच्या नाही तर
तूमच्या-आमच्या सारख्या स्वतःला सामान्य म्हणवून घेणा-या (माझ्या मते
कूणीही सामान्य नसतॊ) लोकांच्याच हातात असते.
आपण रोज वावरताना किती असे कोवळे जीव पाहतो, जे उद्या जाऊन अश्या चार पाच
माकडांच्या हातातले प्याधे होणार हे आपले सामान्य (?) चक्षू सांगतात,
त्यांच्यासाठी आपण काय करतो हा कळीचा मूद्दा !! आता सगळं घडून गेल्यावर
rally काढून प्रश्न सूट्णार नाहीत ...
राजकारणी, पूढारी, पोलिस, या सर्वांकडे बोट दाखवताना आपण मी "काय करायचं"
हे विसरतो किंवा तसा आव आणतो

Harshada Vinaya said...

जाऊदे....मीही इथे बरळून काही होणार नाही ..sorry...ओघात बोलत गेले....

clark said...

mala police job
cleriacal job

आशा जोगळेकर said...

जोवर सद्सदविवेक बुध्दी जागृत होणार नाही तोवर भ्रष्टाचार संपणार नाही. तुमचा लेख अगदी जळजळीत अन् सामयिक आहे पण ...............
जणु काही झालंच नाही असे आपण वागतो पुढील दहशतवादी हल्ल्या पर्यंत . नंतर परत तीच नाटकं.आरोप प्रत्यारोप पण काय चुकलं काय केलं म्हणजे हे पुन्हा घडणार नाही ह्याचा विचार होतच नाही .
आज इतक्या महिन्यां नंतर ही ती दृष्यपरत डोळ्या समोर उभी राहिली.