Thursday, May 31, 2012

कलीयुगाची सुरवात

महाभारताचा अकरावा खंड वाचताना, एका ठिकाणी अडखळलो. मृत्यूशय्येवरील पहुडलेल्या भीष्मांनी पांडवांना केलेल्या उपदेशात कलीयुगाच्या खुणांबद्दल सांगितले आहे. त्यात मुली जन्मताच गर्भधारणा योग्य जन्माला येतील असे लिहिले आहे. आणि विचार करता मानवाने कलियुगाला कसे आमंत्रण देऊ केले आहे हे कोडेही उलगुडू लागले. शहरातील मुलींचा विचार करता त्यांचे वयात येण्याचे प्रमाण सातव्या आठव्या वर्षीच दिसून येते. एका शिक्षिकेने सांगितलेली गोष्ट विचार करायला लावणारी आहे. ती म्हणते मुली आपले बालपण हरवून बसत आहेत. वयाच्या सहाव्या सातव्या वर्षापासूनची बंधने कशी आणि कोणी समजवायची? हे प्रमाण शहरात जास्त दिसून येते. कारण शोधायचा प्रयत्न केला ते प्रत्येक गोष्टीचे होणाऱ्या औद्योगिकीकरण ह्याच विषयात सामाविले आहे. शहरातील वस्ती वाढल्यावर अनेक वस्तुंचा पुरवठा एक गठ्ठा होऊ लागला. दुधाच्या मोठ्या मागणीमुळे आरे, आणंद, अमूल, महानंदा, वारणा सारखे अनेक दुग्धुद्योग नावारुपास आले. अनेक गाई म्हशींचे तबेले उदयास आले. ह्यात गाई म्हशीच्या तुलनेत बैल व रेड्यांची संख्या नगण्य राहू लागली. गाई म्हशींची गर्भाधारण कृत्रीम रेतनद्वारे म्हणजेच इंजेक्शन द्वारे केले जाऊ लागले. ह्या करणामुळे गाई म्हशीं चा लैगीक कोंडमारा होऊ लागला व त्याच्या शरीरातून दुधामध्ये स्त्रीत्वाची जास्त स्त्रावके उतरू लागली. हे दुध प्यायल्या मुळेच मुलींचे वयात लवकर येणे सुरु झाले असावे. कारण गावातून जेथे पिशवीतील दुधाचा वापर कमी आहे, अथवा गाई म्हशी मधील कृत्रीम गर्भधारणा प्रमाण कमी आहे तेथे हा प्रश्न आज कमी आहे. ह्या दुधामुळे मुलींवर परिणाम होतो तसाच तो मुलांवरही होतो. स्त्री स्त्रावाकाम्मुळे मुलांमधील स्पर्मची संख्या घटू लागली आहे. एवढेच नव्हे तर मुलांचे भिन्न लिंगाबद्दलचे आकर्षण कमी होत असून सम लैगीक साम्बधाकडे होणारे आकर्षण ह्याचाच परिणाम तर नसेल ना? मोठ्या शहरातील वाढती गे संख्या ह्याचाच परि पाक नाही ना? माझे विचार Without Statistics Hypothesis असेल कदाचित, पण जाणत्यांनी ह्या गोष्टीचा विचार जरूर करावा. पशुवैद्यक तसेच मानव वंश शास्त्रावर अभ्यास करणाऱ्या शास्त्रज्ञांनी ह्या गोष्टीचा अभ्यास करणे आवश्यक आहे असे मला वाटते