Saturday, December 20, 2008

वा-याची झुळुक

वा-याची झुळुक,
हालवीते वेल,
नादवीते झाड....गुदगुल्या!
वा-याची झुळुक,
नाजूक तरंग
तरीही अभंग.....जलाशय!
वा-याची झुळुक,
पारिजात सडा
सुगंधे भारिला....परिसर!
वा-याची झुळुक,
गाली बट खेळे,
कशी दूर करु.....नजरेने!
वा-याची झुळुक,
हेलावीते मन
हिंदोळा बनूनी.....आठवणी!
वा-याची झुळुक,
आनंद भरला,
पुरुनी उरला.....पानोपानी!!!!

Saturday, December 13, 2008

झालय कुठे काय?

२६ नोव्हेंबरला मुंबईतील दणका सर्व जगाला जाणवलाय, अमेरिका अस्वस्थ झाली, पाकिस्थान नेही कार्यवाही करू अशी दर्पोक्ती केली आहे. पण भारतातील जनता जनार्दनाला याची कितपत जाणिव झाली आहे कोणास ठाउक? दोन दिवसाच्या अथक कार्यवाही नंतर दहशतवादी मारले गेले. पण आपलं सगळं पितळ उघडं पाडून मेले.
दहशतवादापेक्षा अधिक महत्वाचे अंतर्गत रोगांनी आपल्याला ग्रासलय त्याकडेही पहाणे आवश्यक झालय.
भ्रष्टाचार हा तर एडस पेक्षा अति घातक, तो दहशतवादाला मदत करतोच, म्हणून तर दहशतवादी राजरोसपणे सर्व सीमांचे उल्लंघन करून सहजपणे कोठेही कोणत्याही शहरात राहू शकतात.
पंचतारांकित हाटेलात साध्या भारतीयाला हटकणारे भरपूर असतील, गरीबाला लांबूनही बघणे जीथे दुरापास्त तेथे दहशतवादी चार चार गोणी सामान काय एका दिवसात घेउन जाउ शकतात? तेथील सरदारी दरवानांचे हात आणि मुंडकी दिवसरात्र सलाम करून शौर्य काय असते ते विसरून गेले आहेत. टिप्स घेउन लाचार झालेले हात आता गुलाम झाले आहेत.भारतीय आदरातीथ्याच्या नावावर दरवानांचे मिशांचे झुपके फक्त देखल्या देवा सारखे उरलेत. दररोजचे हजारो लाखो रुपये घेउन धंदा करणा-या ह्या हाटेलना स्वत:ची सुरक्षा यंत्रणा कोणतीच नाही काय?
CST रेल्वे स्टेशन वर तर प्रवासींची झालेली हत्या तर फारच दयनीय होती. दोन दहशतवादी क्षणार्धात साठ सत्तर मुडदे पाडतात, आणि बाकी गर्दी काय शांती मंत्र म्हणत आपलं षंढत्व झाकतं! एक माईचा लाल ह्या गर्दीत न जन्मावा ह्याच फार वाईट वाटतं. दुस-याच्या दु:खाकडे आपल्या घाईच्या नावावर कानाडोळा करण्याची वृत्ती येथे धोका देउन गेली.
पंचवीस वर्षापूर्वीचा मला डोंबिवली स्टेशन मधिल प्रसंग आठवतोय. महिलांच्या डब्यातून एक गरोदर महिला उतरताना फ़लाटावर पडली, डब्यातील शंभरहून उतरलेल्या अगदी मध्यमवर्गी मराठमोळ्या महिला तीच्याकडे न बघता,ओलांडून स्टेशन मधून बाहेर पडत होत्या, डब्यात चढणा-या तीला ओलांडून चढल्या, हजारो पुरुष तेथून सटकले, पण एक जणही तीला मदत करायला धावला नाही. तीची पर्स व पिशवी उचलून मी त्या ताईंना बसवलं. त्यावेळी डोबिवली स्टेशन वर पिण्याचे पाणीही मिळले नाही, त्यावेळी बिस्लेरी मिळत नव्हत्या. पाच दहा मीनीटात स्वत:ला सावरून ती उभं रहाण्याचा केविलवाणा प्रयत्न करू लागली, एव्हाना फ़लाटावर पाच दहा महिला लेडिज ड्ब्याजवळ आल्या होत्या, तरीही कॊणी तीला उभ रहायला मदत केली नाही.लोक काय म्हणतील हे सर्व विसरून मी त्या ताईला उभ केलं. कुठ जायचय, चालवतय ना विचारून पिशवी पर्स घेतली व त्यांना हात धरून पूर्वेकडे रिक्षापर्यंत पोचविले. सांगायचा उद्देश एवढाच,वेळेला उपयोगी पडायचे नसेल तर जगायचं तरी कशाला? घाईच्या नावावर माणूसकी विसरत असाल तर भारतीय संस्कृतीचे गुण गायची मूळीच आवश्यकता नाही.
रेल्वेच्या एकाच डब्यात चार जणांची पाकीटे मारली जातात, एकाला पकडलं जातं. त्या पाकेटमाराचे सोबती त्याला मारायच नाटक करित खाली उतरतात आणि रेल्वे सुरु होताच हसत हसत परत आपल्या कामाला लागतात. ईतरांच्या दुःखाचा क्षणभर तरी विचार करायला हवाच! ह्या सगळ्याचा कहर म्हणजे हरविलेल्या पाकिटातील ड्रायव्हींग लायसेन्स मिळ्वून देण्यासाठी एका पोलिसांने एक हजार रुपये मागितले. जनतेचे रक्षकच जर चोरांचे सा्थीदार बनून जगत असतील तर बघायचे तरी कॊणाकडे?
नोकरशाही आणि लोकशाही यांनी एकमेकावर अंकूश ठेवला नाही आणि हातात हात घालून भ्रष्टाचार करू लागले तर देशाचे भविष्य जाणार तरी कोठे?
२६ नोव्हेंबरचा एपिसोड शिवराज पाील, आर आर आबा आणि विलास रावांचे बळी घेउन नूसताच थांबला नाही तर नारायणास्त्र नीकामी करून अशोकरावांची वर्णी लाऊन गेला. देशावरील संकटसमयात गृहमंत्री पदावर कोणीही नसताना, देशाचे संरक्षण मंत्री व परराष्ट्र मंत्री महाराष्ट्राचे मुख्यमंत्री निवडण्याचे हिजडचाळे चार दिवस करित होते.त्यांच्या पुरुषार्थाला साजेलसा निर्णय त्यांनी स्वतः न घेता परत दिल्लिला सोनियाचे दारी जाउन सोडवला.
ह्या सर्वावर कहर म्हणजे लोकसभेतील पाच खासदार अटॅक च्या वेळी ताज मधे उतरले होते. हे जनतेचे सेवक खासदार समितीच्या नावावर कोणत्या तरी कंपनीच्या लाचार कृपेने पंचतारांकीत हॉटेलात रहात होते. त्यातील जयसींगरावांची प्रतिक्रिया लाज आणणारी होती,जनता जळत असताना जयसींगराव लॅ्पटॉप वर इलेक्शन्चा प्रोग्रॅम ठरवीत होते. त्यांची ताज मधिल खातिरदारी चांगली होती हे सांगायलाही ते विसरले नाहीत. मढ्यावरचे लोणी खा्णा-या ह्या खासदारांना दहशतवाद्यांच्या आधी गोळ्या घालून मारायला हवे.
भाजपाच्या तोंडातील राजस्थान व दिल्लीचा घास कॉन्ग्रेसच्या मुखी लागला, दिल्ली व रा्जस्थान मधील मुस्लिमांची एक गठ्ठा मते कॉन्ग्रेसला मीळाली. बसपाची मते कमी झाली. हिंदूत्वाच्या नावावर गुजरात नको हिच भावना मुस्लिमांची असावी.
नारायण राण्यांचा नारोबा करण्याचा चान्स समग्र कॉन्ग्रेसवाल्यानी सोडला नाही. एका आमदाराची प्रतिक्रिया फारच बोलकी होती. लोकसभा निवडणूकीच्या आत नारायण राणे वेगळे पाडायचे हे समजूनच त्याना कॉन्ग्रेसमद्ये घेतले होते.ते बाहेर जातांना त्याच्याबरोबर कॉन्ग्रेसवाला कोणीही नसेल तर त्यानी आणलेले काही जण कॉन्ग्रेसमधेच रहातील. आणि घडतयही तसेच. नारायणराव आता माझ्या बोलण्याचा अर्थ असा नव्हता अ्सेही खुलासे करित आहेत.एकूण काय राण्य़ानी पांघरलेले वाघाचे कातडे उसवले.
शहिद पोलिसांना श्रद्धांजलीचे राजकारण सर्वच करित आहेत. केरळचे मुख्यमंत्री अच्युतानंदननी चटकन माफ़ी मागून पडदा पाडला. नरेन्द्र मोदींनी देउ केलेल्या एक कोटीवर विलासराव कोटी करायचे विसरले नाहीत, पण मदतीचा हात देताना आकडा फ़ुगलेला दिसला नाही.सा्ध्वीचे राजकारण करायला गेलेल्या ATS ला दहशतवाद्यांकडून चपराक मिळाली हे मात्र वाईट झाले.
शांतीमंत्राचे अनुसरण करणारी जनता, स्वतःची शक्ती ऒळखून प्रतिकार करायला वेळेवरच शिकली नाही तर स्वतःच्या घरी दारीच पानीपत घडतांना बघायला मिळेल. शारीरीक आ्णि मानसिक शक्तीची प्रतिष्ठापना प्रत्येक नागरिकाने करणे आवश्यक आहे. राष्ट्रिय स्वयंसेवक संघाने सेवा कार्याबरोबरच हे काम अधिक जोमाने करायला हवे. स्पर्धेच्या युगात संघ विद्यार्थी व युवकांना आकृष्ठ करण्यात अपूरा पडतोय हे मात्र खरे आहे. रामदेव बाबा,SSY,सहजयोग,रविशंकर किंवा आध्यात्माकडेही वेळप्रसंगी झुकणारा तरूण वर्ग राष्ट्रीय कार्यात उतरतांना उदासीन का? ह्याचे उत्तर शोधलेच पाहिजे.
जनता मनातून घाबरली असली तरी झालय कुठ काय? सारखं वागत परत कामाला लागलेली दिसत आहे.

Wednesday, November 5, 2008

निवडणूक उमेदवारांसाठी काही बंधने

जगातील मोठ्या लोकशाही देशात भारताची गणना होते. वयाची १८ वर्षे एवढ्याच किमान आधरावर आपण मतदार बनू शकतो. वयाच्या एकविशी नंतर कोणीही नगरिक निवडणुकीसाठी उमेदवार बनू शकतो. समंजस आणि सुशिक्षीत देशात एवढयाच आधारावर लोकशाही तगेलही कदाचित. पण निरक्षरता, अंधश्रद्धा, जातीपाती, भाषा आणि प्रांतवाद, लिंग व धर्मभेद, वंशवाद, वर्गवाद आणि सर्वात महत्वाचे म्हणजे घराणेशाही ह्या सर्व रोगांनी जर्जर झालेल्या लोकशाहीला वाचवायचे असेल तर निवडणूक उमेदवारांसाठी काही किमान बंधने आणणे अत्यंत आवश्यक झाले आहे. काही बंधने मला सूचताहेत, तुम्हाला आणखी काही सुचत असतील तर अवश्य लिहा. आपण एकत्र करून ती पंतप्रधान, विरोधी पक्षनेते, निवडणूक आयोग ह्या सर्वांकडे ती पाठवून देउ. लोकशाही दृढ आणि मजबूत करण्यासाठी आपण विचारी झालेच पाहिजे.

१)ग्राम पंचायत/ नगर पालिका/महानगर पालिका पातळीवर २१ वर्षे ही किमान वयोमर्यादा योग्य आहे.
२)उमे्दवार किमान SSC असावा. दोन पेक्षा जास्त मुले नसावीत.
३)गुन्हेगार नसावा, कोर्टात पोलिस केस प्रलंबीत असल्यास निवडणुकीत उभे रहाता येउ नये.
४)पंचायत समिती/जिल्हा परिषद निवडणूक लढविण्यासाठी त्याला ग्राम पंचायत सदस्यत्वाचा पाच वर्षाचा अनुभव असणे आवश्यक आहे
५)आमदारासाठी पाच वर्षाचा पंचायत समिती/जिल्हा परिषद सदस्यत्वाचा अनुभव अथवा महानगरपालिका सदस्यत्वाचा दहा वर्षे अनुभव आवश्यक आहे.
६)खासदारकी साठी विधान सभा/परिषद सदस्यत्वाचा पाच वर्षे अनुभव आवश्यक आहे.
७) पक्ष बदलल्यावर पाच वर्षे निवडणूक लढविता येणार नाही.
८) सर्वच सदस्य निवडून आल्यावर सदनाचे काम व समाजसेवा सोडून कोणताच व्यवसाय करणार नाहीत. शेती वा उद्योग असेल तर तो कुटूंबियानी सुरु ठेवावा. मात्र असे अर्थार्जन करणा-या सदस्यांना कोणतीच कर सवलत असू नये.
९) मंत्रीपद कोणत्याही एका सदनात दहा वर्षापेक्षा अधीक काळ भॊगता येउ नये.
१०)मुख्यमंत्री, पंतप्रधान, सभापती पदासाठी ही मर्यादा सर्व मिळून १५ वर्षाची असावी

वरील सूचनांवरून असे लक्षात येईल की साधारण सुशिक्षीत व आमदारकी साठी १० वर्षे अनुभव असलेले व खासदारकी साठी किमान १५ वर्षे अनुभव असलेले उमेदवारच पुढे जातील, त्यांचे जिवन नीतीमान असेल व राहील.समाज सेवा हा लोकप्रतिनीधींचा स्थाय़ी भाव बनेल.

Thursday, March 6, 2008

कर्जमाफीचे राजकारण

२००८ च्या अर्थसंकल्पात ६०,००० कोटींची शेतकरी कर्ज मुक्ती करून मा चिदंबरम साहेबांनी थोडा दिलासा मिळवून दिला. कर्ज मुक्ती हा शेतक-यांच्या दयनीय अवस्थेला एक उतारा असला, तरी योग्य उपाय योजनेसाठी कोणताही विचार झालेला जाणवत नाही. गेल्या वर्षी महाराष्ट्रात सुमारे १०,००० शेतक-यांनी व सुमारे ३००० जणानी अन्य राज्यात,बहुतांशी आंध्र व कर्नाटक मध्ये आत्महत्या केल्या होत्या. त्या आधींच्या वर्षातील ही संख्या सुमारे २५००० हॊती. महाराष्ट्रातील बहुतेक आत्मह्त्या पिडीत कुटूंबाची कर्जे फारतर प्रत्येकी वीस हजार पासून लाखभर रुपयांची होती. कर्जे शेतीसाठी घेतली होती असेही नव्हते, म्हणजे कर्ज जमीन गहाण ठेउन मुलीच्या लग्नासाठी, कुटूंबातील आजारपणासाठी आणि मुलांच्या शिक्षणासाठीही घेतली होती. बहुता:शी कर्जे खाजगी सावकार व पतपेढ्या ह्यांचीच हॊती. हा सर्व सारासार विचार करता कर्जमुक्ती योजना फक्त शेतक-यांच्याच फायद्याची नसून त्यात प्रचंड मोठा राजकिय स्वार्थ दडला आहे. शेतक-यांच्या नावावर घेतलेली सुमारे ५०,०००कोटींची राजकिय कार्यकर्त्याची बूडीत कर्जे, सहकारी पतपेढ्या व सहकारी बॅकांतील संचालक मंडळातील राजकारण्यांनी घेतलेली अवाढव्य कर्जे ह्या योजनेतून माफ होणार आहेत. नव्या येणा-या निवडणुकांसाठी कार्यकर्त्यांना ही दिली गेलेली भेट आहे.
आज महाराष्ट्रात ह्या कर्जमाफ़ीचे क्रेडीट घेण्यासाठी स्पर्धा सुरु झाली आहे. शिवसेनेचे आंदोलन वेळ ऒळखून गेले सहा महिने सुरु होते. मा उद्धव ठाक-यांनी जबरदस्त वातावरण निर्मिती करून महाराष्ट्र सरकारला आव्हान निर्माण केले. भाजपाचा मात्र प्रमोदजी गेल्यापासून शक्तीपात झाल्यासारखे वाटत आहे. विदर्भात अथवा उर्वरीत महाराष्ट्रात त्यांनी ह्या विषयात काहीच हेल काढलेले जाणवले नाहीत. मा शरद पवार केंद्रिय कृषीमंत्री असल्याने त्य़ानी हे क्रेडीट क्लेम करणे क्रमप्राप्तच आहे, आता महाराष्ट्राच्या महसूल मंत्र्यांनी क्रेडीट कार्ड क्लेम केले आहे आणि ते ही सर्व महाराष्ट्रीय काँग्रेस मंत्रीमहोदयांना नपूंसक ठरवून!
कर्जमाफीचे क्रेडीट हा राजकिय स्वार्थ झाला, पण हेच राजकारणी शेतक-यांच्या दयनीय परिस्थितीचे व आत्महत्यांचे पाप आपल्या माथ्यावर घेण्यास तयार आहेत काय?
कृषीप्रधान देशात शेती विकसीत व्हावी म्हणून गेल्या साठ वर्षात काय करण्य़ात आले?
शिक्षणात शेतीला कितपत स्थान आहे?
पदवी प्राप्त भारतीयाला गहू किंवा तांदूळाच्या दहा जातींची नावे तरी सांगता येतील काय?
शेतीमध्ये बुध्दीवान लोक यावेत म्हणून प्रयत्न झाले काय?
शेती संशोधन किती प्रमाणात शेतात उतरविले जाते?
शेतकरी अधिक तरबेज व्हावा म्हणून गाव पातळीवर कोणत्या योजना आहेत?
निसर्ग शेती आता उरली आहे काय?
शेती मालाच्या हमीबाजारा साठी कोणती योजना आखली गेली काय? त्यानुसार कोणत्या गावात कोणते पीक किती जमिनी वर घ्यावे ह्याचे तारतम्य सरकार ठरवते काय?
सरकार दरबारी प्रशासन,पोलिस,कर,पोस्ट,रेल्वे,फ़ाँरेस्ट,फ़ाँरेन अशा अनेक विशेष सेवा आहेत(IAS,ITS,IRS,IPS,IFS वैगरे), सरकारला शेती व ग्राम विकसनासाठी अशी सेवा सुरु करावी अशी इच्छा नाही काय?
गाव व शहर ह्यातील दरी दूर करावी ह्यासाठी प्रयत्न होत आहेत काय?
हे प्रयत्न झाले नाहीत तर बॅ अंतुले मुख्यमंत्री असताना केल्यासारखी कर्जमाफी, पुढील पाच सहा वर्षांनतर परत एकदा करावी लागेल.

Wednesday, February 13, 2008

कोण मी? कोण मी !!

द्वैत मी, अद्वैत मी
कल्पित मी अन सत्त्य मी ॥
रुद्र मी, अंगार मी
शाक्त मी, संघर्ष मी ॥
सूप्त मी, स्वप्निल मी
बीज मी, अंकूर मी ॥
सूर मी, संगीत मी
नाद मी अन गंध मी ॥
कष्ट मी, उत्कर्ष मी
रुप मी, सौंदर्य मी ॥
दूर तरीही संग मी
वेदनेतही शांत मी ॥
काल मी, आज मी
भूत अन भवितव्य मी ॥
आदिअंतातीत मी
विजयातील यत्न मी
दिव्यतेचा भक्त मी

शोधतो स्वत:ला!

गर्दीतही मी एकटा, शोधतो स्वत:ला।
कोलाहलात नि:शब्द मी, ऐकतो स्वत:ला ॥
एकंतीही गर्तेत सा-या, हरवितो स्वत:ला ।
निसर्गातील प्राण मी, सजीवतो स्वत:ला ॥
हरवितो, शोधतो अन समजतो स्वत:ला ।
कोण मी, कोण मी, भांडावितो स्वत:ला॥

Sunday, February 10, 2008

भरपूर शिक्षण आणि अविरत संशोधन

भरपूर शिक्षण आणि अविरत संशोधन हिच राष्ट्रप्रगतीची गुरुकिल्ली आहे!
देश प्रगतीपथावर आहे म्हणजे काय? उत्तर एकच, कमी श्रमात कमी वेळात बुद्धीच्या वापराने वेगाने निर्मिती. मग ती कोणत्याही उत्पादनाची असो, उत्पादनातून पैसा, पैशातून सुबत्ता, सुबत्तेतून सम्रुद्धी॒, आणि सम्रृद्धी बरोबर शांती नांदली तरच ते राष्ट्र ख-या अर्थाने वैभवशाली बनते. हिन्दुस्थान ह्याच मार्गाने शतकानुशतके वैभव शाली परंपरा नांदवत होता. वैभवावर ईतरांची नजर पडणारच, गेली सातशे वर्षाच्या ह्या परकिय गुलामगिरीतून गेली साठ वर्षे आपण डोके काढून कोठे बाहेर बघू लागलो आहोत. मात्र जातियवाद, प्रांत वाद, भाषा वाद, धर्म वाद, वंशभेद, लिगंभेद आदी शत्रूंबरोबरिल आपली लढाई मात्र संपलेली नाही. ह्या लढाईतून निकोप स्पर्धा निर्माण झाली असती तरी चालले असते, पण ह्यातून फ़क्त निर्माण होत आहेत "वाद", एकमेकांना संपविण्याचॆ!प्रत्येक गोष्टीचे राजकारण! आणि अनितीच्या मार्गाने पैसा जमवून मिळवलेली सत्ता! ह्या सर्वांवर मात करुन प्रगती करावयाची असेल तर एकच उत्तर, ज्ञान आणि शक्ति ह्यांची एकत्र जोपासना! लोकमान्य टीळकांनी संगितलेली गुरुकिल्ली. ह्यात ज्ञानार्जनाच्या बरोबर संशोधन फार महत्वाचे आहे. संशोधनाने कित्येक रहस्य सहज गोष्टी होवुन जातात.कित्येकांचे श्रम वाचतात. कच्चा माल, वेळ,मेहनत व त्रास ह्या सर्वांना वाचवायचे असेल तर संशोधनाला पर्याय नाही.
ज्याला बुद्धीचे वरदान आहे, त्याने संशोधन केलेच पाहिजे! शाळातून अशा मुलांची निवड करुन फ्क्त डीग्रीच्या मागे न लागता,त्यांना सतत पुढचे शिक्षण लगेच दिले गेले पाहिजे. अमेरिकेत अशा विशेष प्रविण विद्यार्थ्याना शालेय शिक्षण लवकर संपवुन संशोधनाकडे जाण्याचा मार्ग खुला असतो. आपल्याकडिल चित्र मात्र वेगळे आहे. बुध्दीवान मुले व्यावसायीक शिक्षणाकडे वळताना दिसतात. चांगले व्यवसायिक शिक्षण म्हणजे भरपूर पैशांची परदेशी नोकरी!मुलगा अथवा मुलगी अमेरिकेत गेली म्हणजे इतिश्री झाली. हि संकल्पना वाढायला लागली आहे. मुले परदेशी शिकायला जातात ह्याचाच अर्थ,तेथील शिक्षण उच्च दर्जाचे आहे, जे आपल्याकडे नाही ते ज्ञान तेथे आहे. हे दुष्ट चक्र संपवायचे असेल तर मा अब्दुल कलामांचा मंत्र अमलात आणायलाच हवा. अविरत संशोधनाने आपला शिक्षण स्तर वाढवायलाच हवा. नालंदा तक्षशिला विद्यापीठांसारखी हजार विद्यापीठे येथे कार्यरत व्हायला हवित. दिडशे कोटीं जनतेच्या बुध्दीचे मालक आम्ही! ही शक्ति भांडणात नव्हे तर संशोधनात वापरायला हवी!

Friday, February 1, 2008

महा भ्रष्ट राजकारणी आणि संधिसाधू राजकारण

टी चंद्रशेखर ह्या कर्तव्यदक्ष सनदी अधिका-याचा राजिनामा अखेर मंजूर होणार असे संकेत कालच्या मा मुख्यमंत्र्यांच्या मुलाखतीतुन दिसून येत आहे. सनदी अधिकारी प्रामाणीक, प्रजा हित दक्ष असेल, निर्णय क्षम योग्यतेचा असेल तर सरकारी तारु तो कसे हाकलु शकतो,हे तिनइकर,प्रधान,शेषन,किरण बेदी, टी चंद्रशेखर सारख्या अनेक दिग्गजांनी दखवीले आहे. पण भ्रष्ट राजकारण्यांना आज हवे आहेत, हुजरे सनदी अधिकारी! जे राजकारण्यांच्या स्वार्थाचा रथ हाकलतील, मंत्र्यांच्या स्वार्थासाठी सर्व शासकिय शक्ति पणाला लावतील.
पोलिस दलातील भरतीच्या कथा, बदल्यांची बोली, मोक्याच्या जागांवरिल दावेदारी ह्यांचे म्हणे आता स्टान्डर्डायझेशन झाले आहे.महसूल विभागातील गमती तर आणखी चविष्ट! वनीकरणासाठी म्हणून स्वजनांच्या ट्रस्ट ला शहरातील मोक्याची जागा अगदी एक रुपया भुई भाड्याने ९९९ वर्षे द्यायची, आणि वर्षभरात तेथे इमारतींचे रान निर्माण करायचे, अरबो रुपयांची संपत्ती देशात बनवून स्वीश ब्यांकेत ठेवायची. महसूल मंत्र्यांच्या पत्नीला असाच एक कर्नाळा अभयारण्यातला वीस एकराचा भुखंड तातडीने मिळतो आहे. झट मंगनी पट शादी सारखे, आज जमिन मिळावी म्हणून अर्ज, कर्तव्य दक्ष जिल्हाधिकारी, वन विभाग ह्यांच्याकडुन एका दिवसात अनुमोदन, आणि केन्द्रिय मंत्र्याकडे दोन दिवसात फ़ाईल सुपुर्द, आणि कदाचित आठवड्या भरात कर्नाळा अभयारण्यात आणखी एक बिबट्या स्वताचा पेट्रोल पंप, होटेल, बार आणि असे अनेक वनीकरणाचे उद्योग सुरु होतील.असे सनदी अधिकारी आपली स्वत:ची मोठी माया निर्माण करतात, आणि सरकारी रथ मंत्र्यांच्या सोइने हाकत रहातात, त्यांच्यासाठी प्रजा ही य:किन्चित असते.
टी चंन्द्रशेखर कोठेही जाओत, ते सनदी अधिका-यांना मार्गदर्शक ठरतील. किरण बेदी यांनी सेफ़र इन्डिया चे काम सुरु केले आहे त्यासाठी शुभेच्छा!

Sunday, January 13, 2008

Developing strengths help in Productivity!

Knowledge gain, and its utmost utilization, is only way to acquire super place in the world!
Indian education system is creating lifelong loss of whole population, especially the young generation, because they are not being taught for increment in knowledge in any of the education pattern in Indian contest. Let it be any board, CBSE, ISE or university level!
We ever blame Mecalay Pattern of education, it was a need of British Empire. After Independance no british government insisted to continue with existing system in India.
Rather it is a defeat of our foresight and planning that no educationist or polititian ever forecasted, what is exact need & requirement of India. It was never emphasised for encashing our strengths. Develop the strengths & create the opportunities.
I always like to find strengths of any individual, who comes in my contact. Depending on the nearness I discuss with the person for his strengths. Sometimes I have found that the strengths were not even known to the person, developing or encashing leave apart.
There is enough freedom in the system, but it never helps in identifying channels for development of the strengths.
Every school/ education institution must engage or take help of concillor to identify strengths of every individual in view for career planning and developing better productive life.
I remember example of my one of the friends, who always liked trees, plantation, farming and agriculture than engineering. He completed his engineering, got good jobs and money, but never got satisfaction, today at the peak of his career, he has left the job and staying alongwith his doctor wife and doing nothing. Some four months back, we met after fifteen years and I was really shocked. I suggested him about his old hobbies, those he had also fogotten.
It gave him a spark, he has started hiking Himalayas, Sahyadri and Satpuda. Yesterday I received his phonecall telling he has started taking student groups for treaks and nature study. His wife was thanking me a lot, as my friend has started enjoying life again.
I always apply vector science to the career. Liking, intelligance, efforts and environment are four vectors, if they act in one direction then the person always gain super position. If they counter each other the resultant vector is always have weak output.