Friday, February 1, 2008

महा भ्रष्ट राजकारणी आणि संधिसाधू राजकारण

टी चंद्रशेखर ह्या कर्तव्यदक्ष सनदी अधिका-याचा राजिनामा अखेर मंजूर होणार असे संकेत कालच्या मा मुख्यमंत्र्यांच्या मुलाखतीतुन दिसून येत आहे. सनदी अधिकारी प्रामाणीक, प्रजा हित दक्ष असेल, निर्णय क्षम योग्यतेचा असेल तर सरकारी तारु तो कसे हाकलु शकतो,हे तिनइकर,प्रधान,शेषन,किरण बेदी, टी चंद्रशेखर सारख्या अनेक दिग्गजांनी दखवीले आहे. पण भ्रष्ट राजकारण्यांना आज हवे आहेत, हुजरे सनदी अधिकारी! जे राजकारण्यांच्या स्वार्थाचा रथ हाकलतील, मंत्र्यांच्या स्वार्थासाठी सर्व शासकिय शक्ति पणाला लावतील.
पोलिस दलातील भरतीच्या कथा, बदल्यांची बोली, मोक्याच्या जागांवरिल दावेदारी ह्यांचे म्हणे आता स्टान्डर्डायझेशन झाले आहे.महसूल विभागातील गमती तर आणखी चविष्ट! वनीकरणासाठी म्हणून स्वजनांच्या ट्रस्ट ला शहरातील मोक्याची जागा अगदी एक रुपया भुई भाड्याने ९९९ वर्षे द्यायची, आणि वर्षभरात तेथे इमारतींचे रान निर्माण करायचे, अरबो रुपयांची संपत्ती देशात बनवून स्वीश ब्यांकेत ठेवायची. महसूल मंत्र्यांच्या पत्नीला असाच एक कर्नाळा अभयारण्यातला वीस एकराचा भुखंड तातडीने मिळतो आहे. झट मंगनी पट शादी सारखे, आज जमिन मिळावी म्हणून अर्ज, कर्तव्य दक्ष जिल्हाधिकारी, वन विभाग ह्यांच्याकडुन एका दिवसात अनुमोदन, आणि केन्द्रिय मंत्र्याकडे दोन दिवसात फ़ाईल सुपुर्द, आणि कदाचित आठवड्या भरात कर्नाळा अभयारण्यात आणखी एक बिबट्या स्वताचा पेट्रोल पंप, होटेल, बार आणि असे अनेक वनीकरणाचे उद्योग सुरु होतील.असे सनदी अधिकारी आपली स्वत:ची मोठी माया निर्माण करतात, आणि सरकारी रथ मंत्र्यांच्या सोइने हाकत रहातात, त्यांच्यासाठी प्रजा ही य:किन्चित असते.
टी चंन्द्रशेखर कोठेही जाओत, ते सनदी अधिका-यांना मार्गदर्शक ठरतील. किरण बेदी यांनी सेफ़र इन्डिया चे काम सुरु केले आहे त्यासाठी शुभेच्छा!

4 comments:

HAREKRISHNAJI said...

वा किती परखड व योग्य ते लिहीले आहेत. मी सुद्धा या विषयावर लिहीलेआहे, पण अगदीच मुळमुळीत.

मला असे लिहीता येत असते तर.

Mohan Lele said...

Hare Krishnaji,
You are person of god, hence there is limitation for you to write in harsh language. Rather right thoughts in mild language affects more & proper.

Sneha said...

patat... chid yete.. pan natar kahich ghadat nahi.... :(

Mohan Lele said...

Sneha,
What u say, is common thing with every lady & gentleman in the country. Does it mean, we all have to live with the situation. We all r like a squirrel, but one Anna Hazare can get power from our thinking only. All great persons were not born Heros. They tried, fell, again tried, miserably fell, again tried and then they could get success. It was only because of getting continuos support & power towards journey of destination. You get anger, thats fine! Now let us write that feelings and made known to others. This can be enough inspiration to many more people, to think! some people to write! and few to act!
Thank u Sneha!